Wednesday 14 March 2012

प्रतिसाद




 प्रतिसाद
 www.daptaryswiwah.com प्रतिसादावर सगळं काही अवलंबून असतं.असं आमची एक मैत्रीण म्हणाली.तिला विचारलं तू आणि तुझे आई-वडील तुझ्या लग्नाचं बघत होते ते मिशन कुठ पर्यंत आले? त्यावर तिचं असं न कळणार उत्तर होतं. आम्ही आमचे चेहरे काही समजलं नाही असे केले.ते बहुतेक तिला कळलं असावं.म्हणून ती सविस्तर उत्तर द्यायला तयार झाली.
     ती म्हणाली मी अनेक स्थळं पहिली,पण एकानेही मला प्रतिसाद दिला नाही.आमच्या एका मित्राची पण  हीच समस्या होती. अग पण तू साद तरी घातलीस का?’
   छे! मला कुठे एवढा वेळ.?
म्हणजे तू फक्त चित्रं पहिली ?आमच्यातल्या एकीने विचारले.तिला फोटो म्हणायचे होते.
हो.
मग त्या फोटोंना कसं कळेल की तुझ्याशी संपर्क साधायचा आहे ते?असाच प्रश्न आम्ही आमच्या मित्राला केला तरी त्याचं एकच पालूपद- आम्हांला कोणी प्रतिसाद देत नाही.
 असं का होत असेल ? याचा विचार केला तेव्हा काही कारणं लक्षात आली.पहिलं कारण तर तुम्हांला कळलच असेल की हे लोक फक्त माहिती आणि फोटो स्वतः बघतात आणि समोरच्या व्यक्तीला काही न कळवता प्रतिसादाची अपेक्षा करतात.हे कसं शक्य आहे?दुसरं कारण म्हणजे त्यांच्या जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा असतात.बरं अपेक्षा करतांना त्यांच्या स्वतःची माहिती त्या अपेक्षा पूर्ण करण्या इतकी सक्षम आहे का? हे तपासून पाहत नाही.तिसरं कारण म्हणजे जेव्हा केव्हा त्यांच्याशी कोणी संपर्क साधण्याचा प्रयत्न करी तेव्हा ते अलिप्तपणे सांगतात की ,ते कामात खूप busy आहे, आत्ता त्यांना वेळ नाही.नंतर फोन करण्याचे आश्वासन देवून ते फोन करत नाही.असं करण्यात त्यांना कमीपणा वाटतो.मग हळूहळू त्यांना संपर्क करणारे टाळू लागतात.मग प्रतिसाद येत नाही अशी त्यांची ओरड सुरु होते.
    लग्नाचे बघतांना राहणीमान,नोकरी, आणि भौतिक वस्तूंची रेलचेल या गोष्टी आधुनिक नजरेने बघत असलो तरी काही बाबतीत आपण खुपच पारंपारिक असतो.आणि बऱ्याच वेळा प्रतिसाद देतांना आपण पारंपारिक होतो.सगळ्यांचं कुटुंब आधुनिक विचारांचं पण सगळेजण निश्चितपणे पत्रिका बघणार.काहीजण तर ठराविक व्यक्ती कडूनच बघणार.मग मुलगी,मुलगा आवडला नाही,किंवा त्याचे शिक्षण,पगार,व्यक्तिमत्व आवडले नाही तर पत्रिका जुळत नाही असं सांगणार.यात विचार जुळले आहेत  असं फार कमी वेळा होतं.ज्यांना पत्रिका बघायची आहे त्यांनी तिची मर्यादा ठरवायला हवी.
     आणखीन एक फार महत्वाचं कारण लक्षात आलं ते हे की,बऱ्याच वेळा मुलं-मुली पालकांच्या समाधानासाठी स्थळं बघतात,पण त्यांना योग्य प्रतिसाद देत नाही.म्हणजे पालक आणि मुलं यांच्यात मोकळा संवाद नसतो.दोघांच्या बाजू योग्य असल्या तरी काही गोष्टी परिस्थिती नुसार ठरवाव्या लागतात.काहीवेळेस मुला-मुलींनी लग्न ठरवलेले असतात तरी त्यांचे पालक मान्य करत नाही.मग पालकांना अंधारात ठेवण्यासाठी नाव नोंदणीचा खेळ खेळला जातो.पण त्यामुळे जी व्यक्ती संपर्क साधते तिला प्रतिसाद मिळत नाही.

No comments:

Post a Comment