Friday 20 April 2012

परिपूर्ण


  www.daptaryswiwah.com आई मी जरा बाहेर जावून येते.थोडा उशीर होईल.,स्मिता घाईघाईने बाहेर पडत आईला म्हणाली.
 अग जरा सांगून तर जाशील का की तू कुठे जात आहेस ते?
काल आपण ज्या मुलाची माहिती वाचली ना? त्याच्या ऑफिस मध्ये.
पण त्याला न कळवताच?
बघू जमतयं का? सगळं
स्मिता एका कंपनीच्या ऑफिस मध्ये आली आणि शिपायाला विचारलं.की समीर मराठे यांचं ऑफिस कुठे आहे? तिने त्याला ते लांबून दाखवायला सांगितलं.तिने तो आत बसलेला माणूस मराठे बघितला आणि लंच ब्रेक होई पर्यंत खाली थांबली.तो खाली आल्यावर तिने स्वतःची ओळख करून दिली. त्यालाही आठवलं की घरी या मुलीच्या संदर्भात बोलणं झालं आहे. तिची भेटण्याची ही पद्धत आवडली.(  त्यामुळे घरचा एक पारंपारिक समारंभ वाचला आणि वेळ ही वाचला ).ती दोघं समोरच्या हॉटेल मध्ये गेले आणि काही खायला मागितलं.तर स्मिता म्हणाली मी फक्त कॉफीच घेईन.मी खूप हेल्थ कॉन्शस आहे.तुम्ही रोज इथे येवून खातात का?
  तर समीर म्हणाला,मी मला जे आवडतं ते असं अधूनमधून खातो.मग दोघांनी एकमेकांशी गप्पा प्लस चौकश्या केल्या आणि आपापल्या कामाला परत गेले.
  घरी येवून स्मिताने त्याला नकार कळवला.

२. अमित आज ती मुलगी तुला भेटायला येणार आहे माहित आहे ना?
     हो किती वेळा तेच तेच सांगते.येण्याआधी तिला फोन कर असं म्हटलं आहे.
 अरे तुमची भेट आठ दिवसापूर्वी ठरली होती,मग तूच वेळ काढून ठेवायला हवा.
ठेवलाय.पण सोय म्हणून तिला तसं सांगितलं.
 मला वाटतं ही मुलगी इतर मुलींपेक्षा तुझ्या अपेक्षांच्या अधिक जवळ पोहचणारी आहे.तू काही थातूर मातूर कारण सांगून नकार कळवू नको.
  मला आवडली तरच होकार कळवीन.
अरे --- आई काही बोलण्याच्या आधीच हताश होवून थांबली.
अमित संध्याकाळी आला ते मनात नकार घेवूनच.
का? काय झालं?
तिच्या चेहऱ्यावर वांग आहेत.
मग काय झालं? ज्या माणसं उजळ असतात त्याच्या चेहरा असा असू शकतो.
पण फोटोत दिसत नव्हता.
म्हणजे लांबून दिसत नाही.शिवाय हे वांग मधून मधून दिसतात.
पण मला हे पटलं नाही.
अरे मुलगी सगळ्या दृष्टीने चांगली असून तू असं करतोस हेच मला पटत नाही.
  ३.
तुम्हांला आम्ही सी.ए. असणारी मुलगी दाखवा असं म्हटलं होतं ना? तरी तुम्ही आम्हांला दुसरं स्थळ दाखवलं.
   आम्ही सांगितलेली मुलगी सी.ए.च्या परीक्षेला बसली होती.पण तिच्या वडिलांनी तिच्या माहितीत सी.ए. असं लिहलं होतं.ती केवळ २३ वर्षाची होती.पदवी परीक्षेनंतर ती ही परीक्षा देत होती.त्यांचा मुलगा ही २५ वर्षाचा होता.पण त्यांना आमचं वागणं पटलं नाही.आम्ही त्यांना चुकीचं स्थळ दिलं असं वाटलं.म्हणून ते आमच्यावर रागवले.
  खरं बघितलं तर आमच्याकडे सी.ए. झालेल्या मुली नव्हत्या हे आम्ही स्पष्ट सांगितलं होतं.शिवाय इतक्या कमी वयात सी.ए. पूर्ण होणं अशक्य होतं.आणि केवळ सी.ए.च मुली बघणं आणि इतर शिकलेल्या मुली न बघणं म्हणजे ते स्वतःला मर्यादा घालून घेत आहेत असं आम्हांला वाटलं.कारण हे लग्न फक्त व्यवसायाशी होणार.एकमेकांच्या स्वभावाला,इतर कला गुणांना त्यात काहीच स्थान नसणार.असं वाटलं.कारण स्वभाव,आवडीनिवडी आणि व्यवसाय ही एकच जमून येणं तसं अवघड होईल.
    त्यांचं म्हणणं होतं की मला शोधत अनेक ठिकाणांहून लोक येतात.मी काही फी वगैरे भरलेली नाही.
   केवळ ती मुलगी सी.ए. नाही म्हणून त्यांनी नकार कळवला.

४.  मला एकदम सुंदरच मुलगी हवी.मी आजपर्यंत त्यासाठीच थांबलो.निलेश तावातावाने म्हणत होता.तो स्वतः ३३ वर्षाचा आहे.तो गेल्या ५ वर्षांपासून स्थळं बघत आहे.त्याला एकही मुलगी सुंदर वाटत नाही.एखादी मुलगी जर आपण त्याला सुचवली तर तो म्हणतो मी सुंदरते बाबत कोणतीही तडजोड करणार नाही.सौदर्य हे सापेक्ष असतं.शिवाय ते वयाबरोबर कमी होत जातं,बदलत जातं.शिवाय तुझी नजर कशी आहे हे यात मोडतं.तुझंही वय /लग्नाचं वय होत चाललं आहे.तू सुद्धा काही दिवसांनी आता आहे तसा दिसणार नाही.पण तो ऐकायलाच तयार नाही. त्याच्या या सुंदरतेचा व्याख्येत त आई- वडिलांच्या सूचना सुद्धा बसत नसल्याने त्यांनी त्याच्या लग्नाची जबाबदारी त्याच्यावरच टाकली.आणि आता तो आमच्या वर वैतागतो.
    सौदर्य हे फक्त रुपातच असतं का? ते एखाद्या व्यक्तीच्या कामात,स्वभावात,त्याच्या छोट्या छोट्या वागणुकीतही असतं.मदत करण्यात,माणुसकीतही असतं. हे आपण बघणारच नाही का? की केवळ काळ बदललाय एवढीच हाकाटी आपल्या कपड्यांमधून, आणि रोजच्या वापरण्याच्या वस्तू मधून देत राहणार.आपल्या वागणुकीत,विचारसरणीत काही बदल होणार आहेत की नाही.

५. तुम्ही आमचा एक निरोप पोहचता कराल का? मंगेशच्या वडिलांनी विचारले.काय निरोप आहे.तर म्हणाले,की त्यांना कळवा की मुला-मुलीचा रक्तगट एक येत आहे त्यामुळे आम्ही पुढे जावू शकत नाही.रक्तगट एक असेल तर काही अडचणी येत नाही.विशेषतः बाळंतपणात.फक्त निगेटिव्ह,positive असला तर थोडी अडचण येते.पण त्यावरही वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत.आणि शिवाय रक्तगट हे किती मर्यादित आहेत,ते कोणाचे आणि कोणाचे सारखे येणारच.रक्तगट एक असले तर लग्न करू नये याला फारसा शास्त्रीय आधार नाही.आपण विज्ञानाचा आधार घेवून वेगळ्याच अंधश्रद्धा निर्माण तर करत नाही ना? हे लक्षात घ्यायला हवे.

६.  त्या मुलाने पहिल्या भेटीतच तिचा पगार विचारला.म्हणून आणि त्याच्या कुटुंबाचं असं काहीच उत्पन्न नाही.सगळं यांच्या पगारावरच अवलंबून राहील.म्हणून मुलीने नकार दिला.
   मुलाच्या आणि तिच्या नकार देण्यापूर्वी चार-पाच भेटी झाल्या होत्या.शिवाय ते chatchat करत होते.फोन वर बोलत होते.तो पर्यंत तिला ते छान वाटलं.पण मुलाच्या घरी गेल्यावर तिला वाटलं की हे सगळं आपल्यालाच सांभाळावं लागेल असं तिला वाटलं.म्हणून नकार दिला.
    मागच्या वेळी कुटुंबाचं उत्पन्न हे मुलाच्या उत्पन्नापेक्षा जास्त होतं,तिच्या उत्पन्ना पेक्षा जास्त होतं,तेव्ह कुटुंबाच्या उत्पन्नाला काय महत्व द्यायचं असं वाटून तिने नकार दिला होता.
   अशी नकाराची कारणे आपण सांगितलेल्या अपेक्षेत बसणारी स्थळं असली तरी येतात कारण आपल्या माहितीत न दिलेली खूपशी माहिती दडलेली असते.meaning between lines खूप काही असतं.ते आपण लक्षात घेत नाही.सगळं काही परिपूर्ण असं हवं असतं,आणि ते तसं कधीच नसतं.

Thursday 12 April 2012

कुटुंब


                                   
कुटुंब
     www.daptaryswiwah.com  आम्हाला फक्त चांगलं कुटुंब हवं ,बाकी काही नको.आजकाल चांगली संस्कारी कुटुंब कुठे दिसतात? असें आम्हांला मुला-मुलींचे पालक नेहमी सांगत असतात.कुटुंब हा विषय प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे. चांगलं संस्कारी कुटुंब म्हणजे काय?किंवा तुमच्या कुटुंबाची विचारसरणी कशी आहे? असं विचारलं तर काय उत्तर येईल?प्रत्येकाला आपलं कुटुंब आदर्श वाटतं,करण आपण त्या कुटुंबात वाढलेले असतो. त्यातील अनेक गोष्टी आपल्या सवयींच्या झालेल्या असतात. त्यामुळे प्रत्येकाची कुटुंबाची व्याख्या वेगवेगळी असणार हे नक्की . आदर्श कुटुंब हे प्रत्येकाने पाहिलेले स्वप्न आहे. कारण आदर्श कुटुंब हे अपोआप ready -made तयार होत नाही.त्यासाठी काही बंधेने घालून घ्यावी लागतात. जर बंधने घालून घ्यावी लागतात. जर तुम्ही म्हणाल कि आमचं कुटुंब साधं ,निर्व्यसनी,हेवेदावे नसणार आहे.हे तर तुमच्या कुटुंबाचे चांगले गुण आहेच. पण ते परंपरावादी आहे का? की पुरोगामी आहे?लोकशाही ,समानता,सामाजिक बांधिलकी   अशा कोणत्या विचारांचं आहे किवा त्या विचारांच्या  जवळ जाणारे आहेत. हे ही आपल्याला बघायला हवे.मुलगा आणि मुलगी या दोघांनी आपल्या कुटुंबाची विचारसरणी कोणती आहे हे लग्नापूर्वी लक्षात घ्यायला हवी. कारण तरच तुम्ही दुसऱ्या कुटुंबाकडून काही अपेक्षा करू शकतात. 
   आज प्रत्येकाला आपलं मानणारी आणि आपली वाटणारी एक जागा हवी आहे. ती जागा म्हणजे कुटुंब असे बहुतांशी लोकांना वाटते. लग्नातून ती गरज पूर्ण व्हावी असेही अनेकांना वाटते. आज पाश्चिमात्य देशामध्ये कुटुंब संस्था हादरतांना दिसते. कारण कुटुंब संस्थेचे स्वरूप सर्व जगभरच  बदलत आहे.कुटुंबाचा विचार करतांना तिचं बदलतं स्वरूप लक्षात घ्यायला हवं. शेतीप्रधान व्यवस्थेतल स्वरूप उद्योग प्रधान व्यवस्थेतल स्वरूप आणि आजचं जागतिकीकरणातले कुटुंबाचे स्वरूप हे वेगवेगळे  आहे. हे बदल वैयक्तिक पातळीवरही होतात.
  
म्हणूनच लग्न करतांना प्रत्येक व्यक्तीच्या विचारसरणीत,वागण्याच्या पद्धतीत कुटुंबाची विचारसरणी महत्वाची भूमिका बजावत असते हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे चांगलं ,संस्कारी कुटुंब म्हणजे काय हे वेगवेगळ्या अंगांनी तपासून बघायला हवे. म्हणजे त्या कुटुंबातील कोणत्या घटकाशी आपल्याला जुळवून घेता येईल हे शोधता येईल. कारण भारतीय विवाह पद्धतीत दोन कुटुंबे एकमेकांशी नात्याने जोडली जातात. कुटुंबात नवीन येणाऱ्या व्यक्तीला मनाची उदारता दाखवत सामावून घेण्याची वृत्ती हवी.
  
अजूनही आपल्याकडे लग्न हे आई-वडील ,नातेवाईक यांच्या संमतीने ठरतात. त्यावेळी दोन्ही कुटुंबाचा शैक्षणिक,आर्थिक,सामाजिक स्तर बघितला जातो. मात्र कुटुंबाची विचारसरणी कशी आहे,वैचारिक,सांस्कृतिक आहे का? याकडे गंभीरपणे पहिले जात नाही. काही कुटुंबात सतत माणसांची ये-जा चालू असते. काही ना काही कार्यक्रम ठरवले जातात. त्यामुळे सगळेचजन खूप काम करून आनद घेतात . तर काही कुटुंबात वर्षो न वर्षं कोणी येत नाही. थोडाही आवाज घरात होत नाही. गाणी सुधा ऐकली जात नाहीत. प्रत्येक पै-पै  चा हिशोब तपासला जातो व त्यात सगळ्यांनाच धारेवर धरले जाते. मग जी व्यक्ती उदार मनोवृत्तीच्या घरातून आली आहे ती या कुटुंबाशी कसे जुळवून घेणार? किंवा गाण्याची आवड असणारी व्यक्ती ,अभिरुची संपन्न व्यक्तीला तसेच घर मिळाले नाही तर कसं होणार? म्हणून कुटुंब कसं आहे. याचा विचार अधिक  खोलवर जावून करायला हवा. कारण आपणही होमपीच वर अधिक मोकळेपणी राहू शकतो नाही का?

Monday 9 April 2012

अहंकार


अहंकार
www.daptaryswiwah.com आम्ही मुलाकडचे आहोत,आम्ही कशाला त्यांना फोन करून विचारू किंवा आमची माहिती सांगू’ असं एक काकू तावातावानं सांगत होत्या. मागच्याच आठवड्यात अशाच एक काकू आमच्या मैत्रिणीला फोनवरून सांगत होत्या की,तुम्ही मुलांची माहिती वगैरे देतात हे ठीक आहे पण ‘माझी मुलगी लाखात एक आहे,ठरवलं तर रस्त्यावरचा कोणीही राजकुमार तिला उचलून नेईन.’किंवा आणखीन एकजण म्हणत होत्या,माझ्या मुलाला पाहिलं तर ५६ मुलींची रांग लागेल’. अशा प्रकारची वाक्ये आपण सर्वचजण ऐकत असणार किंवा कधीकधी असमजुतीने बोललोही असू.
   मित्र-मैत्रिणींनो आपण सर्वचजण दिवसांतून १०-१५ वेळा तरी जग बदलल्याची ग्वाही देत असतो.मग ३०-३५ वर्षापूर्वीचीच वाक्ये आणि समजुती आपल्याला काय सांगत आहेत?आपण मुलाकडचे म्हणजे श्रेष्ठ,सुंदर मुलगी म्हणजे रस्त्यावरचा राजकुमार.आज या दोन्ही गोष्टी वास्तवाच्या नजरेतून पहिल्या तर किती भयानक आहेत हे आपल्या लक्षात येत नाही का?
  आज प्रत्येक घरात एक किंवा दोन मुलं असतात.प्रत्येकाला ती महत्वाची वाटतात.लग्न ही तर दोन मनां बरोबरच दोन कुटुंबांनाही जोडणारी गोष्ट आहे.तरीपण आमच्या काकू आपल्या आपल्या मुलाची माहिती आपणहून सांगण्यास तयार नाही किंवा एखाद्या चांगल्या मुलीची माहिती मिळाली तर आपणहून तिच्याशी संपर्क साधत नाही.मग अशावेळी त्या मुला-मुलींनी काय करावे.स्वतःच स्वतःच्या लग्नाचे बघावे का? त्यांनी स्व्ठ्ठून ऑनलाईन मुलीचा फोटो,माहिती पहिली,पालकांना सुचवली तरी त्यांना ते फारसे रुचत नाही.केवळ स्वतःच्या अहंकारा पोटी दोन्ही कुटुंब अडून राहिली तर आपण बदललो असं कसं म्हणणार.अर्थात माणूस म्हटलं की,’अहं’ आलाच.पण दोघांनीही समजुतीनं घेतलं तर विवेकाने काही विधायक गोष्टी होतील.मैत्रिणींनो रोजच्या आयुष्यातही आपण या ‘अहंकाराला तोंड देत असतो.पण लग्न सभारंभात मात्र  तो विशेष सभारंभीय थाटात वावरतांना दिसतो.
      विवाहासाठी ऑनलाईन नाव नोंदवणारी अनेक मुलं-मुली आहेत.त्यातील कित्येकजण तर आधुनिक शास्त्रातले,व्यवस्थापनतले पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.ते स्वतःच्या शहराला घट्ट चिकटून आहेत. त्या चौकटी बाहेर त्यांना जायचे नाही किंवा दुसरं काही त्या पलिकडे चांगलं असू शकतं हे ही ते बघायला तयार नाही. म्हणजे मी मुलगा आहे,इतका भरपूर पगार मिळवतो,तसेच मी मुलगी आहे,सुंदर आहे,भरपूर शिक्षण घेतले आणि भरपूर पगाराची नोकरी आहे. या रूढ विचारा बरोबर माझं शहर सोडून मी येणार नाही किंवा जाणार नाही.किंवा तिथली मुलगी नको,मुलगा नको.असं काहीसं चालू आहे.काय म्हणायचं याला.अति आधुनिकपणा ?नवीन पिढी जर आपण स्वतःला म्हणत आहोत तर मागच्या पिढ्यांपेक्षा कोणता नवीन विचार आपण करत आहोत? हे बघायला पाहिजे नाही का?
   काही पालक आणि त्यांची मुलं मात्र खूप समजुतीने वागतात. ते समजून घेतात की,लग्नाची गरज दोघांना आहे,मुलगी कुठे नोकरी करत असेल तर आपणहून तिच्या सुट्टीच्या दिवशी ते भेटण्याचे ठरवितात. तसेच आम्ही’मुलाकडचे’ ही रूढ पद्धत ते बाजूला ठेवतात.आमच्या कार्यालयाला भेट देणाऱ्या सविता आणि शीला काकू आम्हांला नेहमी आदर्श वाटतात. त्या दोघीजणी विहिणी आहेत.पण आता त्यांची छान मैत्री झाली.सविता काकू त्यांच्या मुलासाठी स्थळ बघत होत्या.सहज बोलता बोलता त्यांना मीनलची माहिती मिळाली. त्या आपलं सगळं काम टाकून त्यांच्या संपर्कात राहिल्या आणि आज त्यांची मुलं छान संसार करीत आहेत. त्या म्हणतात,अहो,मुलगा-मुलगी शिक्षण ,नोकरी यात सेटल होईपर्यंत त्यांचं वय २७-२८ होतं आणि त्यापुढे जर आम्ही पालकांनी आमचे इगो सांभाळत राहिलो तर ह्या मुलांनी लग्न कधी करावे आणि आम्ही नातवंडं कधी पहावीत.त्यांची वय वाढली तर सगळंच अवघड होईल.कारण समस्या काही तुम्ही मुलाकडच्या की मुलीकडच्या असं विचारून येत नाही.