Sunday 24 June 2012

प्रेमाची भाषा


www.daptaryswiwah.comसमीर आणि सुषमा यांनी आई- वडिलांच्या मदतीने स्वतःचे लग्न ठरवले होते. वेब साईटवर एकमेकांची माहिती बघून ,संपर्क साधून त्यांनी एकमेकांना जाणून घेण्यास सुरुवात केली.काही दिवस,महिने  कामाच्या वेगवेगळ्या जागा आणि वेळा यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट होणं कठीण गेलं. पण यावर्षी आपण जोडीदार शोधायला हवा असे दोघांनाही मनापासून वाटत होते. शिवाय त्या दोघांना काम आणि आपलं खाजगी आयुष्य यांची जागा ज्या त्या ठिकाणी कशी असावी हे ही माहित होतं.म्हणून त्यांनी फोन,इमेल या संपर्क माध्यमाशिवाय प्रत्यक्ष भेट घ्यायचे ठरवले. कारण प्रत्यक्ष भेटीत व्यक्ती फोटोपेक्षा वेगळी असू शकत. त्या व्यक्तीचा आवाज,बोलण्याची शैली ,चेहऱ्यावरचे हावभाव,त्याची वागण्याची पद्धत प्रत्यक्ष दिसते आणि त्या सगळ्या मुले व्यक्ती अधिकच सुंदर दिसते असे समीरला आणि मितालीला वाट्त  होते. कारण फोटोमध्ये मिताली थोडी जाड दिसायची यामुळेही काही जणांनी तिचे प्रोफाईल बघण्याचे टाळले होते. मिताली म्हणते,हे बरं झालं .कारण मला वरवर बघून हो म्हणणाऱ्या व्यक्तीला जोडीदार म्हणून निवडायचेच नव्हते.
   ५-६ वेळा प्रत्यक्ष भेटल्या नंतर मिताली आणि समीर यांना वाटले की,आपण एकमेकांबरोबर छान राहू शकू. घरी सांगून लग्न करण्यास हरकत नाही. म्हणून त्यांनी घरी सांगितले. तर तोपर्यंत लग्नाचे मुहूर्तं संपले होते. शिवाय या दोघांनाही पुढचे सहा महिने सुट्टी मिळणार नव्हती . काय करावे? त्या दोघांनी सहा महिन्यानंतर लग्न करूयात असे ठरवले. आणि मधल्या काळात एकमेकांना भेटू या ,हिंडू या असे ठरवले. एकमेकांना भेटी देत,सरप्राइजेस देत त्यांनी लग्नाचा आधीचा  काळ enjoy  केला. नंतर त्यांचे लग्न झाले. वर्षभर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या.एकमेकांचे आवडतं  संगीत ऐकले.वेगवेगळे पदार्थ खाऊन पहिले. त्यांचे दुसरे वर्ष ही कंपनीचे प्रोजेक्ट ,नवीन पद ,जबाबदाऱ्या यांच्यासहित चांगले गेले.
     दोन वर्षानंतर दोघानाही एकदम प्रश्न पडला.लग्नानंतर आपल्यातील प्रेमाचे काय झाले? काहीजण हा प्रश्न मित्रांना विचारतात,काहीजण समुपदेशकाला ,तर काहीजण धार्मिक उपदेशकाला ,ज्योतिषाला विचारतात. तर काहीजण स्वतःलाच विचारतात. काहीवेळेस या संदर्भातील उत्तरे मानसशास्त्रीय भाषेत दिल्याने ती अधिकच दुर्बोध वाटतात. काहीवेळेस या प्रश्नाकडे विनोदी पद्धतीने पहिले जाते. अर्थात बऱ्याच वेळा विनोदात काही सत्य दडलेले असते. पण ते म्हणजे एखाद्या कॅन्सर रुग्णाला अस्पिरीन देण्या सारखे आहे.
     लग्नातून काल्पनिक प्रेमाची अपेक्षा केली जाते आणि बऱ्याच वेळा या अपेक्षेचे मूळ आपल्या मनोरचनेत आहे. प्रत्येक मासिकात वैवाहिक संबंध प्रेमाचे कसे ठेवायचे यावर एकतरी लेख निश्चितच असतो.या विषयावरील अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. दूरदर्शन ,आकाशवाणीवरही या संदर्भात कार्यक्रम असतात. वैवाहिक जीवनात प्रेम टिकवून ठेवणे ही गंभीर बाब आहे.
     समीर आणि सुषमा ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्यामध्ये काम करतात. त्या कंपनीत संवाद कौशल्याच्या अनेक कार्यशाळा आयोजित केल्या जातात. काहीवेळेस त्यात जोडीदारालाही  सहभागी करून घ्यायचे  असते . त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या काही प्रश्नांची उत्तरे मिळाली.
     मित्रानो जसे मराठी,हिंदी,गुजराथी,कन्नड ,जपानी,चीनी ,फ्रेंच आदी भाषा आहेत. हे आपल्याला माहित आहे. आपण सर्वजण आपल्या पालकांची ,नातेवाईकांची भाषा शिकत मोठे होतो. जी आपली प्राथमिक किंवा मूळ भाषा असते. नंतर आपण अजून भाषा शिकतो पण त्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. ती आपली दुसरी भाषा असते. या दुसऱ्या भाषेचा उपयोग आपण जितका अधिक करू तितके आपण सहज होवू.भाषा ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जर आपण परिणामकारक संवाद साधला तर आपण सांस्कृतिक रेषासुध्दा ओलांडू. आपण फक्त ज्यांच्याशी  संवाद साधायचा आहे. त्यांची भाषा शिकणे आवश्यक आहे.
     हीच गोष्ट प्रेमाच्या राज्यात लक्षात ठेवायची. तुमची भावनिक भाषा यात इंग्लिश आणि चीनी भाषेत जितका फरक असेल तितकाच फरक असेल. जसे समीर प्रामाणिकपणे सुषमाला सांगत होत की, माझे तुझ्यावर प्रेम आहे.तुझ्या कामाचा मला अभिमान वाटतो.वगेरे .पण सुषमाला हे प्रेम त्याच्या वागणुकीत दिसत नसेल तर. म्हणजे फक्त प्रामाणिक असणे पुरेसे नाही. आपण आपल्या जोडीदाराची प्राथमिक प्रेमभाषा शिकून घेतलीच पाहिजे. जर तुम्हाला प्रेमाचे प्रभावी संवादक व्हायचे असेल तर? तुम्हांला काय वाटते? या संदर्भात बरेच काही सांगण्या सारखे आहे.ते मात्र पुढच्या लेखात.

Monday 4 June 2012

योग्य वय

      www.daptaryswiwah.comनीताच लग्न ठरलं आणि आम्ही सगळेच एकदम खुष झालो. एवढ्यात !इतक्या लगेच!  पटकन ! असे विविध उदगार काढून सगळयांनी तिचे आनंदाने अभिनंदन केले. खरतर तिच्या पालकांच्या मनात इतक्या पटकन लग्न जमेल असं वाटत नव्हते. पण नीताने योग्य वयात लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिच्या आयुष्यात 'लग्न' हा केंद्रीय भाग नव्हता .पण ते जर करायचे आहे तर योग्य वयात करू.असे तिला वाटले. म्हणून तिने लग्न करण्यासाठी आई -वडिलांना होकार दिला. ती म्हणते ,'मला योग्य जोडीदार हवाच होता. मला माझे पुढचे सगळे दिवस छान त्याच्या बरोबर आनंदात काढायचे होते. हे माझं स्वप्नं म्हणा हवं तर पण वास्तवाला धरून पाहिलेलं स्वप्न होतं. म्हणूनच ते पूर्ण झाल्याचा तिला आणि तिच्या पालकांना आनंद वाटत होता.
 
नीताच म्हणणं आपल्यालाही पटेल. लग्न करायचं आहे की नाही . ते का करायचं ? त्याचे व्यवस्थित मुद्दे तिने लिहून काढले. त्यातून अनेक मुद्दे पुढे आले. प्रथम तिला सर्वात महत्वाचा मुद्दावाटत होता तो म्हणजे समवयस्क जोडीदाराची सोबत. नंतर तिने लग्नाकडून स्वतःच्या अपेक्षा जशा लिहल्या तसेच ती स्वतः कशी आहे,तिचे प्लस point आणि ती कोणत्या गोष्टीत कमी पडते हे ही तिने शोधले . त्यामुळे जोडीदार शोधतांना स्वतःतल्या कमी तिला माहित होत्या.एखादे प्रोफाईल ऑन लाईन बघतांना तिने त्यात काय पहायचे,त्या व्यक्तीच्या अपेक्षा शिक्षण कसे आहे? हे ही तिने स्वतःच्या अपेक्षा आणि शिक्षणाशी पडताळून पहिल्या. कारण बऱ्याच वेळा काय होते मुलगा असतो डिप्लामा  इंजिनियर आणि तो बी.इ. ,एम.इ. मुलींचे प्रोफाईल बघतो आणि त्यांच्याशी संपर्क साधू बघतो.मुलीना त्यांच्या पेक्षा अधिक शिक्षण झालेला मुलगा हवा असतो. मग त्या मुलाला नकार मिळतो आणि तो पुढे मुली बघयला कंटाळतो. लग्न जमत नाही म्हणून तो निराशही होतो. म्हणून आपल्या अपेक्षा ,शिक्षण हे बघूनच प्रोफाईल बघायला हवे. एखादी मुलगी किंवा मुलगा असा असतो की जो शिक्षण ,पैसा यापेक्षा तुमचे विचार,मतं,कुटुंब यांचा विचार करून लग्न ठरवितात. पण त्यासाठी तुम्हांला एकमेकांना भेटायला लागते. भेटण्यासाठी आधी प्रोफाईल पाहावे लागते.
     
मुला-मुलींनी नाव नोंदवतांना आपल्या माहितीत आपले विचार स्पष्टपणे सांगायला हवे. अर्थात सांगतांना समोरची व्यक्ती दुखावली जाणार नाही. याचाही विचार दोन्ही बाजूंनी करायला हवा. एक गंमत   सांगते सुनीलची आई फोनवर बोलत होती. समजा ती सुनीताच्या आईशी बोलते आहे. असे समजू .तर ती म्हणाली ,आमच्या सुनीलला सिनेमा पाह्यला फार आवडतो पण तो कधी ब्लकने तिकीट घेत नाही. तर याचा सुनीताच्या आईला फार राग आला,ती म्हणाली ,सुनिता रोज ब्लकनेच तिकीट खरेदी करून सिनेमा पाहते. नंतर काय झालं असेल--बरोबर आहे  तुमचा अंदाज .दोन्ही फोन खाडकन बंद झाले. वरवर विचार केला तर यात कदाचित वावगं वाटणार नाही.पण सुनीलच्या आईचा बोलताना टोन वेगळा असेल तर सुनीताच्या आईचा राग रास्त म्हणता येईल. म्हणून सुनीलच्या आईने सुनीलला सिनेमा पाह्यला आवडतो. एवढेच म्हटले असते तरी चालले असते नाही का?
       मित्र -मैत्रिणिनो लग्न करायचे हे नक्की असेल तर योग्य वयात निर्णय घ्या. म्हणजे पुढच्या सर्व गोष्टी सोप्या होतात. नाहीतर मुलगा-मुलगी अशीच पाहिजे,शिक्षण,रूप ,नोकरी ,शहर ,कुटुंब या संदर्भातल्या तुमच्या अपेक्षा तुमच्या स्वतःकडे न बघता खूप उच्च असतील तर नकारांना तोंड द्यावे लागेल.मग आपले वय वाढत जाते आणि आपण त्या सर्व प्रक्रियेलाच कंटाळतो. कंटाळलेली व्यक्ती मग कोणत्याही थातूर -मातुर गोष्टींवर विश्वास ठेवायला लागते आणि शेवटी दुःखी होते.त्यामुळे सुरुवाती पासूनच स्वतः आपण कसे आहोत याचा नीट विचार केला तर दुसऱ्या व्यक्तीकडे चिकित्सकतेने न बघता समजुतीच्या भावनेने बघितले तर पुढील जोडीदार सहितचे आयुष्य सहज सुंदर होण्यास मदत होते.
   
योग्य वेळी लग्नाचा निर्णय माणूस म्हणून व्यक्ती म्हणून सहज जगता येइल अशा अनुरूप अपेक्षा आणि तडजोडीची तयारी असेल तर नीता सारखं आम्ही तुमचं अभिनंदन करण्यास तयार आहोत