Wednesday 7 March 2012

तडजोड


  www.daptaryswiwah.com मला मुळी लग्नच करायचे नव्हते,पण माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींचे लग्न झाले आणि ते त्यांच्या संसारात रमले,मी फोन केला तर ते बोलतात,गप्पा मारायला भेटायचे असं ठरवलं की येतातही पण त्यांना सारखी घरची ओढ असते.सतत ते त्यांच्या बायका,नवरे,मुलं आणि मुली यांविषयी बोलत असतात.मग मला त्यांच्या बरोबर फार कंटाळा येतो.पूर्वी सारखी मजा येत नाही.आता त्यांना त्यांचा हक्काचा जोडीदार मिळाला आहे,आणि मी मात्र घर आणि ऑफिस यामध्ये अडकले आहे. शिवाय आई-वडिलांशी सारखा लग्नावरून वाद होतो.अगदी नको वाटते.खरं सांगायचं तर मलाही लग्न करावसं वाटतयं पण भीती वाटते की खूप तडजोडी कराव्या लागतील का? निकिता आमच्या जवळ  तिच्या मनातले विचार सुसंगत रित्या मांडण्याचा प्रयत्न करत होती. आम्हांला तिच्या प्रामाणिकपणाचे खूप कौतुक वाटले.
  खरं तर आयुष्य म्हणजे निवड आणि तडजोड होय. त्यात आपल्याला विरोधाभास वाटतो.पण जर आयुष्यात जर निवडीला भरपूर वाव असेल तर तडजोड करण्याचा प्रश्न येतोच कुठे?मुख्य म्हणजे तडजोड ही सुद्धा आपली निवडच असते.
  म्हणूनच लग्न करण्यापूर्वी सरळ एक यादी करणं गरजेची आहे.की मी कुठे किती प्रमाणात तडजोड करू शकते आणि कुठे अजिबात नाही.अर्थात ही यादी करतांना ति वास्तववादी आणि स्वतः एक माणूस आहे आणि जोडीदार म्हणून एका माणसाचीच निवड करणार आहे हे लक्षात घेणे अति गरजेचे आहे.कारण दुसऱ्या व्यक्ती कडून अपेक्षा करतांना आपण काहीही करू शकतो कारण ते दुसऱ्या कडे ते हवं असं आपल्यला वाटते. स्वतः कडे काय आहे हे बघत नाही.म्हणूनच निकिताला भीती वाटत होती ती तडजोडीची. 
   आयुष्य म्हणजे केवळ मौजमजा,जल्लोष नव्हे.कारण आयुष्यात आपल्याला अतीव दुःख,वेदना,नैराश्य यांना सामोरे जावं लागतं.कधीतरी अकल्पित,अनपेक्षित गोष्टी घडतात,दुर्घटना घडतात,सगळं काही विस्कटून जावू शकतं.अशावेळी आपण काय करायचं? कसं वागायचं? हे आपल्या जवळ कोणत्या विचारांचं पाठबळ आहे यावर ठरतं.इंद्रधनुष्य निर्माण होण्यासाठी उन आणि पाऊस दोन्हींची गरज असते. आपल्या जीवनाबाबतही तसेच असते कधी तिथे अंधःकार तर कशी उजेड असतो.पण आपला जोडीदार हा आपल्यला समजून घेणारा असेल तर आपण सगळ्यातून पुढे जावू शकतो.पण म्हणूनच योग्य जोडीदार निवडतांना कोणत्या गोष्टीत आपण तडजोड करू शकतो हे लक्षात घ्यायला हवे.नाहीतर एवढेच लक्षात घेतले जाते की तो बी.ई,ती बी ई ,तो पुण्यात ती पुण्यात.वरवरच्या या जोड्या आयुष्यातल्या अडचणींवर मात करू शकतील का हे मात्र बघितलं जात नाही.निकिता समजली आहे.म्हणूनच तिने एक असा व्यावसायिक निवडला की जो नोकरी सोडून व्यवसायात आला आहे. ती म्हणते त्याच्याजवळ धाडस तर आहेच पण सकारात्मक विचारही आहे आणि ते ही बाजारपेठेचा विचार करून. मला आवडला.मी तडजोड केली ती त्याच्या नोकरी नसण्याबाबत.आणि तुम्ही?

No comments:

Post a Comment