Monday 20 February 2012

खुसखुशीत गप्पा



मा. शरद उपाध्ये गुणमिलनावर बोलतांना
  मित्र -मैत्रिणीनो आज सगळ्यांनाच पत्रिका बघून लग्न करण्याची इच्छा आहे. कदाचित त्यामागे आजची असुरक्षितता असेल. बदलत्या काळाला तोंड देतांना कशाचा तरी आधार घ्यावा असं वाटत असेल.आपल्या जोडीदाराबद्दल आधीच पत्रिकेमधून कळले तर बरं होईल असं वाटत असेल.कारण कोणतेही असो.पण सगळ्यांना पत्रिका बघायची आहे. काहीचं म्हणणं आहे की,काही वाईट तर होणार नाही ना बघितल्यावर मग काय हरकत आहे. खरच त्याचे परिणाम  चांगले होणार असतील आणि त्याचा आधार मर्यादित घेणार असाल तर हरकत नाही.पण पत्रिकेमुळे लग्न जमण्यास उशीर लागत असेल,किंवा स्वभाव,आवडी-निवडी ,कुटुंब यांचा मेळ बसत असेल आणि पत्रिका जमत नसेल तरी नाही म्हणायचं का? म्हणजे समोर आपलं जुळू शकतं असं दिसत असून न पाहिलेल्या ग्रह-तारे वेठीला धरायचे का?   याबाबत शरद उपाध्ये यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले आणि पालक व मुला-मुलींना काही टिप्स दिल्या.

No comments:

Post a Comment