Wednesday 21 March 2012

विवाहपूर्व समुपदेशनाची गरज



 www.daptaryswiwah.com विवाहपूर्व समुपदेशनाची गरज
पालक जेव्हा मुला-मुलींचे नाव नोंदवायला आमच्या कडे येतात किंवा फोन वर चौकशी करतात तेव्हा ते खूप वेळा सांगतात की विवाहपूर्व समुपदेशनाची फारशी गरज नाही.काहीना तर ते एकप्रकारे fad वाटते किंवा काही लोकांनी मुद्दाम निर्माण केलेली गरज वाटते.पण खरोखरच तसे नाही.आम्ही पालकांना सांगतो की तुमच्या मुलाने किंवा मुलीने एकदा तरी ,विवाहपूर्वी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे,काही गोष्टींचा वेगळ्या पद्धतीने विचार करायला हवा. तेव्हा काहीजण म्हणतात,आमच्या मुलांना सगळं कळतं,आणि त्यात समजून घ्यायचं तरी काय ते आपोआपच कळतं.पण पालकांच्या काळात होती तशी परिस्थिती नाही,ती वेगाने बदलली आणि पालकांच्या काळात जर विवाहपूर्व समुपदेशन असते तर नक्कीच त्यांनी आपल्या जोडीदाराकडे अधिक सजगपणे पहिले असते किंवा तसा प्रयत्न तरी केला असे वाटते.म्हणून आम्ही काही मुद्दांची  नोंद केली आहे ज्यामुळे कळेल की विवाह पूर्व समुपदेशनाची गरज का आहे .
·        लग्न यशस्वी होण्यासाठी मुला-मुलींना त्यांची कौशल्ये विकसित करणे.
·        लग्न इच्छूक मुला-मुलीं मधील विरोधाभास लग्नापूर्वीच ओळखण्यास मदत करणे,आणि ते विरोधाभासां बरोबर जुळवून कसं घेता येईल किंवा ते कोणत्या कारणाने दिसत आहेत ते ओळखून ते संपविणे.कारण या छोट्या विरोधां मुळे पुढील आयुष्यात मतभेद निर्माण होवू शकतात.
·        मुला-मुलींना त्यांची आवड स्पष्टपणे कळत नाही.
·        मानसिकता बदलणे.
·        पालक आणि मुलं यांच्यात संवादाचा पूल बांधणे.
·        कुटुंबामध्ये संवादाची उणीव.पालकांसमोर  एक पर्याय असतो तर मुलांसमोर दुसरा पर्याय असतो.यामुळे गोंधळ निर्माण होतो आणि ते योग्य व्यक्तीची निवड करू शकत नाही.
·        काही लग्न इच्छूक मुलं-मुली त्यांच्या अपरिपक्व मित्र-मैत्रिणीं कडून सल्ले घेतात त्यामुळे अतिशय कठीण आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण होते.
·        लग्न म्हणजे नक्की काय समजून घेणे.
·        आज लग्न चाकोरीबद्ध पद्धतीने ठरावे असं पालकांना वाटत  असले तरी ते लवकरात लवकर ठरत नाही.
·        एकमेकांची अपुरी माहिती,कुटुंब व त्यातील वातावरणाची अनुरुपता ,परस्परांशी जुळवून घेण्याच्या,तडजोड करण्याच्या वृत्तीचा अभाव.
·        पती-पत्नीच्या नात्याकडे दोन व्यक्ती,माणसा तील नात्याऐवजी पुरुष-स्त्री असं बघण्याची पारंपारिक दृष्टी,
·        स्वतःच्या अपेक्षांच्या फूटपट्ट्या दुसऱ्याला लावतांना इतरांच्या अपेक्षांचा मात्र अस्वीकार.
·        पूर्वकल्पना न दिलेल्या अपेक्षांच्या पुर्तेतेचा आग्रह.
·        पुरेसा परिचय होण्यासाठी असलेला अपुरा वेळ
·        सांकेतिक,साचेबंद गोष्टींना अति महत्व त्यामुळे अंतरंगाकडे दुर्लक्ष होत आहे.
·        मुला-मुलींना वाढवण्यात झालेले फरक
·        एकतर्फी तडजोडीला नकार
·        मुलींना झालेली आत्मसन्मानाची जाणीव,
·         शिक्षण,नोकरी,परदेशातील नोकरी यात मुलींनी-मुलांच्या बरोबरीने केलेली घोडदौड
·        आर्थिक स्वावलंबनामुळे आलेलं बळ,
·        जागतिकीकरणामुळे जीवनाला आलेली गती,ताणतणाव,असुरक्षितता,एकाकीपणा,अस्वस्थता
 

या सगळ्या बदलेल्या गोष्टींना सामोरं जावून,त्यांच्याशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने,स्व-बदल घडवून आणणे आवश्यक झालं आहे. व्यक्ती बाहेरचा ताणतणाव घरात आणते आणि तिला तिथे एक समजूतदार व्यक्ती हवी असते. ती व्यक्ती म्हणजे बहुतांशी वेळा जोडीदार असते. त्याच्या कडूनच अपेक्षा केल्या जातात.पण त्यासाठी तुमचं सहजीवन सुंदर आणि स्वास्थ आणि समाधान देणारं असायला पाहिजे. त्यासाठी विवाहपूर्व समुपदेशनाची गरज आहे.




No comments:

Post a Comment