www.daptaryswiwah.com आजूबाजूला अनेक अस्वस्थ पती-पत्नी
दिसतात. तेव्हा खूप वाईट वाटतं.कारण अशी कुटुंबची कुटुंब अस्वस्थ झाली तर सामाजिक
स्थिती बिघडेल आणि त्या सर्व गोष्टीचा परिणाम आपल्या सगळ्यांवर होणार.तुम्ही
म्हणाल आमचा काय संबध या सर्व गोष्टींचा? तुम्हांला असं वाटलं तरी त्याचा
तुमच्याशी संबंध येणारच.म्हणून तुम्ही जेव्हा जोडीदार निवडाल तेव्हा जर मनापासून
आणि खरा विचार कराल तेव्हा मात्र ही परिस्थिती काही प्रमाणात बदलू शकते.
कारण जोडीदार निवडतांना तुम्ही
त्याच्या बाह्य गोष्टी पेक्षा त्याच्या कडे व्यक्ती म्हणून पाहिले पाहिजे. त्याच्या गुणांचा विचार केला तर सहजीवना
फुलेल.आज जी अनेक दाम्पत्यांमध्ये अस्वस्थता दिसते ती दिसणार नाही. कारण तुम्ही
तुमचे अंतर्गत गुण बघून जोडीदार निवडाल.असा जोडीदार जो आपल्या स्वभावाला योग्य
असेल,आपल्या व्यवसायाला,नोकरीला अनुरूप असा जोडीदार नसेल तो.
आज आपण लग्न करण्यापूर्वी घर रंगवून
घेतो,घराची दुरुस्ती करून घेतो,पाहुण्यांना दाखवण्यासाठी काही वस्तू मुद्दाम खरेदी
करतो.मुलांना नोकरी करणारी मुलगी हवी म्हणून तिला तसं तयार केले जाते,मुलीला अधिक
पगाराचा मुलगा हवा म्हणून मुलाला त्या प्रकारे शिक्षण देण्याचा प्रयत्न होतो,चार चाकी
घेतली जाते.सगळ्यांना सुंदर आणि श्रीमत स्थळ मिळावं असं वाटतं आणि त्या आशेवर मोठ
मोठी वाक्ये बोलून खोटी आशा बाळगत नाटक सुरु असतं.
हे सगळं बदलायचं असेल तर बाह्यरुपा पेक्षा आंतला माणूस त्याचे गुण बघायला हवे.पण
त्या आधी स्वतःचा स्वभाव ओळखता यायला हवा.अर्थात ही गोष्ट फार अवघड आहे.कारण “स्वभाव”
या शब्दात खूप अर्थ आहे आणि तो खूप व्यापक आहे.आपल्या घरात बहुतेक वेळा बोलले जाते
की तू आई सारखा किंवा वडिलांसारखा.पण या पलीकडे स्वभावाचा विचार आपण करत नाही. तो
लग्न करण्यापूर्वी करावा,ही एक संधी समजावी असं आम्हांला वाटते.मी जरा शब्दात
मांडण्यासाठी मदत करू शकते.स्वभावासाठी काही शब्द देते,बघा.
संतापी,शांत,मनमिळावू,अलिप्त,आत्मकेंद्री,अबोल,बोलका,मित्रप्रिय,घुमा,आळशी,कामसू,कल्पक,सर्जनशील,जिद्दी,उथळ,खटपटी,तार्किक,सरळ,
अजून बरेच सांगता येईल पण तुम्ही ते शोधा यापैकी तुम्ही कसे आहात ते?मग
तुम्हांला कसा जोडीदार हवा ते लिहा.अहो लग्न करून आयुष्याचा जोडीदार मिळवणार आहोत
मग अभ्यास असायलाच हवा ना.
No comments:
Post a Comment