Saturday 3 March 2012

सहमती


www.daptaryswiwah.com “मी  माझ्या मुलाला सगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं आहे.वेळोवेळी व्यक्तिमत्व विकासाच्या शिबिराला पाठवलं आहे, त्यात त्याने वक्तृत्वकला सुद्धा शिकली.कसं राहावं हे सुद्धा त्याला नीट माहित आहे”आम्ही जेव्हा विवाहपूर्व मार्गदर्शनाच्या कार्यशाळेची माहिती दिली तेव्हा नीलिमाताई संजयच्या आई आम्हांला सांगत होत्या. की त्याला कोणत्याही मार्गदर्शनाची गरज नाही कारण त्यांनी सगळ्या गोष्टी त्याला लहानपणीच शिकविल्या आहेत.खरचं आहे त्यांचं.अशा प्रकारच्या शिबिरांमधून हसतमुखाने कसं बोलावं पासून कोणत्या वेळी कोणता पोशाख घालावा,टेबल manners ही शिकविल्या जातात.तरीपण लग्न करण्यापूर्वी काही गोष्टी आपल्याला माहित पाहिजे.कारण लहानपणच्या त्या शिबिरात आताच्या वयाला काय हवं ते कसं सांगणार?
     लग्न करण्यापूर्वी आपल्याला आपल्यातल्या काही गोष्टी माहित असल्या पाहिज्र. मुख्य म्हणजे स्वतःचा स्वभाव.आणि समोरच्या व्यक्ती तील चांगले गुण ओळखता आले पाहिजे.तरच आपण ज्या सौंदर्याचा विचार करत होतो तो परिपूर्ण होईल.
   आपण जर एखाद्या व्यक्तीला किंवा होणाऱ्या जोडीदाराला भेटायला जाणार असू तर ती व्यक्ती मनाने सुंदर आहे की नाही हे बघायला हवे. सुंदर मनासाठी तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत त्या व्यक्तीशी तुम्हांला मान्य होतील असे मुद्दे शोधायला हवे. खरतर हे खूप अवघड काम आहे.कारण सहमती असणारे मुद्दे हे खऱ्या अर्थाने मान्य असायला हवे, त्यात वरवरची/खोटी मान्यता नको. एखाद्याचे मत मान्य असणे फार अवघड आहे कारण काही लोकांचा सर्वगोष्टी मान्य करण्याचा कल असतो किंवा सर्वच गोष्टी अमान्य असतात. कारण ती व्यक्ती ठरवून आलेली असते आपण कसं वागायचं.पण समोरच्या व्यक्तीला जाणून घ्यायचं असेल तर असे अहंकाराने बांधून घेवून उपयोग होणार नाही.मग आपण सुंदर मनापासून खूप दूर जातो.
   संजयची  सुद्धा हीच अडचण होती. तो अनेक मुलींना भेटला पण न बोलताच घरी निघून आला. म्हणून आम्ही नीलिमाताईना म्हटलं की आम्ही संजयशी बोललो तर चालेल का? तर त्यांनी आम्हांला त्याच्या लहानपणापासूनच्या शिबिरांची माहिती दिली. त्यांनी त्यांच्या परीने योग्य तेच केले पण त्याला अजूनही काही प्रश्न पडू शकतात आणि त्याची उत्तरे त्याचाशी योग्य संवाद साधल्यावर मिळू शकतात. हेच त्यांना मान्य नव्हतं. कारण त्यांना वाटायचे की संजय साठी एकही सुंदर मुलगी येत नाही.म्हणूनच तो न बोलता परत येतो.त्यांना आम्ही चर्चेसाठी बोलावलं तर त्या म्हणाल्या माझा संजय खूप युक्तिवाद करू शकतो,तुम्हांला यू तो हरविल.आम्ही म्हटलं चालेल,पण त्याला येवू तर द्या. आम्ही नीलिमाताई बरोबर ही चर्चेला तयार झालो कारण आम्हाला माहित आहे की,नेहमी आपलेच बरोबर असणे ही महत्वाची गोष्ट नाही आणि ती निश्चितपणे सुंदर नाही.आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्यासाठी संजयला संवाद साधायला काय अडचण आहे याचा शोध घेणे गरजेचे होते.म्हणून आम्ही मनाशी म्हटलं की ,”चर्चा ही प्रामाणिकपणे खरी असावी,त्यात अह्म्कारातील भांडणापेक्षा विषयाला महत्व द्यायला हवे.  

No comments:

Post a Comment