Sunday 24 June 2012

प्रेमाची भाषा


www.daptaryswiwah.comसमीर आणि सुषमा यांनी आई- वडिलांच्या मदतीने स्वतःचे लग्न ठरवले होते. वेब साईटवर एकमेकांची माहिती बघून ,संपर्क साधून त्यांनी एकमेकांना जाणून घेण्यास सुरुवात केली.काही दिवस,महिने  कामाच्या वेगवेगळ्या जागा आणि वेळा यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट होणं कठीण गेलं. पण यावर्षी आपण जोडीदार शोधायला हवा असे दोघांनाही मनापासून वाटत होते. शिवाय त्या दोघांना काम आणि आपलं खाजगी आयुष्य यांची जागा ज्या त्या ठिकाणी कशी असावी हे ही माहित होतं.म्हणून त्यांनी फोन,इमेल या संपर्क माध्यमाशिवाय प्रत्यक्ष भेट घ्यायचे ठरवले. कारण प्रत्यक्ष भेटीत व्यक्ती फोटोपेक्षा वेगळी असू शकत. त्या व्यक्तीचा आवाज,बोलण्याची शैली ,चेहऱ्यावरचे हावभाव,त्याची वागण्याची पद्धत प्रत्यक्ष दिसते आणि त्या सगळ्या मुले व्यक्ती अधिकच सुंदर दिसते असे समीरला आणि मितालीला वाट्त  होते. कारण फोटोमध्ये मिताली थोडी जाड दिसायची यामुळेही काही जणांनी तिचे प्रोफाईल बघण्याचे टाळले होते. मिताली म्हणते,हे बरं झालं .कारण मला वरवर बघून हो म्हणणाऱ्या व्यक्तीला जोडीदार म्हणून निवडायचेच नव्हते.
   ५-६ वेळा प्रत्यक्ष भेटल्या नंतर मिताली आणि समीर यांना वाटले की,आपण एकमेकांबरोबर छान राहू शकू. घरी सांगून लग्न करण्यास हरकत नाही. म्हणून त्यांनी घरी सांगितले. तर तोपर्यंत लग्नाचे मुहूर्तं संपले होते. शिवाय या दोघांनाही पुढचे सहा महिने सुट्टी मिळणार नव्हती . काय करावे? त्या दोघांनी सहा महिन्यानंतर लग्न करूयात असे ठरवले. आणि मधल्या काळात एकमेकांना भेटू या ,हिंडू या असे ठरवले. एकमेकांना भेटी देत,सरप्राइजेस देत त्यांनी लग्नाचा आधीचा  काळ enjoy  केला. नंतर त्यांचे लग्न झाले. वर्षभर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या.एकमेकांचे आवडतं  संगीत ऐकले.वेगवेगळे पदार्थ खाऊन पहिले. त्यांचे दुसरे वर्ष ही कंपनीचे प्रोजेक्ट ,नवीन पद ,जबाबदाऱ्या यांच्यासहित चांगले गेले.
     दोन वर्षानंतर दोघानाही एकदम प्रश्न पडला.लग्नानंतर आपल्यातील प्रेमाचे काय झाले? काहीजण हा प्रश्न मित्रांना विचारतात,काहीजण समुपदेशकाला ,तर काहीजण धार्मिक उपदेशकाला ,ज्योतिषाला विचारतात. तर काहीजण स्वतःलाच विचारतात. काहीवेळेस या संदर्भातील उत्तरे मानसशास्त्रीय भाषेत दिल्याने ती अधिकच दुर्बोध वाटतात. काहीवेळेस या प्रश्नाकडे विनोदी पद्धतीने पहिले जाते. अर्थात बऱ्याच वेळा विनोदात काही सत्य दडलेले असते. पण ते म्हणजे एखाद्या कॅन्सर रुग्णाला अस्पिरीन देण्या सारखे आहे.
     लग्नातून काल्पनिक प्रेमाची अपेक्षा केली जाते आणि बऱ्याच वेळा या अपेक्षेचे मूळ आपल्या मनोरचनेत आहे. प्रत्येक मासिकात वैवाहिक संबंध प्रेमाचे कसे ठेवायचे यावर एकतरी लेख निश्चितच असतो.या विषयावरील अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. दूरदर्शन ,आकाशवाणीवरही या संदर्भात कार्यक्रम असतात. वैवाहिक जीवनात प्रेम टिकवून ठेवणे ही गंभीर बाब आहे.
     समीर आणि सुषमा ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्यामध्ये काम करतात. त्या कंपनीत संवाद कौशल्याच्या अनेक कार्यशाळा आयोजित केल्या जातात. काहीवेळेस त्यात जोडीदारालाही  सहभागी करून घ्यायचे  असते . त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या काही प्रश्नांची उत्तरे मिळाली.
     मित्रानो जसे मराठी,हिंदी,गुजराथी,कन्नड ,जपानी,चीनी ,फ्रेंच आदी भाषा आहेत. हे आपल्याला माहित आहे. आपण सर्वजण आपल्या पालकांची ,नातेवाईकांची भाषा शिकत मोठे होतो. जी आपली प्राथमिक किंवा मूळ भाषा असते. नंतर आपण अजून भाषा शिकतो पण त्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. ती आपली दुसरी भाषा असते. या दुसऱ्या भाषेचा उपयोग आपण जितका अधिक करू तितके आपण सहज होवू.भाषा ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जर आपण परिणामकारक संवाद साधला तर आपण सांस्कृतिक रेषासुध्दा ओलांडू. आपण फक्त ज्यांच्याशी  संवाद साधायचा आहे. त्यांची भाषा शिकणे आवश्यक आहे.
     हीच गोष्ट प्रेमाच्या राज्यात लक्षात ठेवायची. तुमची भावनिक भाषा यात इंग्लिश आणि चीनी भाषेत जितका फरक असेल तितकाच फरक असेल. जसे समीर प्रामाणिकपणे सुषमाला सांगत होत की, माझे तुझ्यावर प्रेम आहे.तुझ्या कामाचा मला अभिमान वाटतो.वगेरे .पण सुषमाला हे प्रेम त्याच्या वागणुकीत दिसत नसेल तर. म्हणजे फक्त प्रामाणिक असणे पुरेसे नाही. आपण आपल्या जोडीदाराची प्राथमिक प्रेमभाषा शिकून घेतलीच पाहिजे. जर तुम्हाला प्रेमाचे प्रभावी संवादक व्हायचे असेल तर? तुम्हांला काय वाटते? या संदर्भात बरेच काही सांगण्या सारखे आहे.ते मात्र पुढच्या लेखात.

No comments:

Post a Comment