Monday 4 June 2012

योग्य वय

      www.daptaryswiwah.comनीताच लग्न ठरलं आणि आम्ही सगळेच एकदम खुष झालो. एवढ्यात !इतक्या लगेच!  पटकन ! असे विविध उदगार काढून सगळयांनी तिचे आनंदाने अभिनंदन केले. खरतर तिच्या पालकांच्या मनात इतक्या पटकन लग्न जमेल असं वाटत नव्हते. पण नीताने योग्य वयात लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिच्या आयुष्यात 'लग्न' हा केंद्रीय भाग नव्हता .पण ते जर करायचे आहे तर योग्य वयात करू.असे तिला वाटले. म्हणून तिने लग्न करण्यासाठी आई -वडिलांना होकार दिला. ती म्हणते ,'मला योग्य जोडीदार हवाच होता. मला माझे पुढचे सगळे दिवस छान त्याच्या बरोबर आनंदात काढायचे होते. हे माझं स्वप्नं म्हणा हवं तर पण वास्तवाला धरून पाहिलेलं स्वप्न होतं. म्हणूनच ते पूर्ण झाल्याचा तिला आणि तिच्या पालकांना आनंद वाटत होता.
 
नीताच म्हणणं आपल्यालाही पटेल. लग्न करायचं आहे की नाही . ते का करायचं ? त्याचे व्यवस्थित मुद्दे तिने लिहून काढले. त्यातून अनेक मुद्दे पुढे आले. प्रथम तिला सर्वात महत्वाचा मुद्दावाटत होता तो म्हणजे समवयस्क जोडीदाराची सोबत. नंतर तिने लग्नाकडून स्वतःच्या अपेक्षा जशा लिहल्या तसेच ती स्वतः कशी आहे,तिचे प्लस point आणि ती कोणत्या गोष्टीत कमी पडते हे ही तिने शोधले . त्यामुळे जोडीदार शोधतांना स्वतःतल्या कमी तिला माहित होत्या.एखादे प्रोफाईल ऑन लाईन बघतांना तिने त्यात काय पहायचे,त्या व्यक्तीच्या अपेक्षा शिक्षण कसे आहे? हे ही तिने स्वतःच्या अपेक्षा आणि शिक्षणाशी पडताळून पहिल्या. कारण बऱ्याच वेळा काय होते मुलगा असतो डिप्लामा  इंजिनियर आणि तो बी.इ. ,एम.इ. मुलींचे प्रोफाईल बघतो आणि त्यांच्याशी संपर्क साधू बघतो.मुलीना त्यांच्या पेक्षा अधिक शिक्षण झालेला मुलगा हवा असतो. मग त्या मुलाला नकार मिळतो आणि तो पुढे मुली बघयला कंटाळतो. लग्न जमत नाही म्हणून तो निराशही होतो. म्हणून आपल्या अपेक्षा ,शिक्षण हे बघूनच प्रोफाईल बघायला हवे. एखादी मुलगी किंवा मुलगा असा असतो की जो शिक्षण ,पैसा यापेक्षा तुमचे विचार,मतं,कुटुंब यांचा विचार करून लग्न ठरवितात. पण त्यासाठी तुम्हांला एकमेकांना भेटायला लागते. भेटण्यासाठी आधी प्रोफाईल पाहावे लागते.
     
मुला-मुलींनी नाव नोंदवतांना आपल्या माहितीत आपले विचार स्पष्टपणे सांगायला हवे. अर्थात सांगतांना समोरची व्यक्ती दुखावली जाणार नाही. याचाही विचार दोन्ही बाजूंनी करायला हवा. एक गंमत   सांगते सुनीलची आई फोनवर बोलत होती. समजा ती सुनीताच्या आईशी बोलते आहे. असे समजू .तर ती म्हणाली ,आमच्या सुनीलला सिनेमा पाह्यला फार आवडतो पण तो कधी ब्लकने तिकीट घेत नाही. तर याचा सुनीताच्या आईला फार राग आला,ती म्हणाली ,सुनिता रोज ब्लकनेच तिकीट खरेदी करून सिनेमा पाहते. नंतर काय झालं असेल--बरोबर आहे  तुमचा अंदाज .दोन्ही फोन खाडकन बंद झाले. वरवर विचार केला तर यात कदाचित वावगं वाटणार नाही.पण सुनीलच्या आईचा बोलताना टोन वेगळा असेल तर सुनीताच्या आईचा राग रास्त म्हणता येईल. म्हणून सुनीलच्या आईने सुनीलला सिनेमा पाह्यला आवडतो. एवढेच म्हटले असते तरी चालले असते नाही का?
       मित्र -मैत्रिणिनो लग्न करायचे हे नक्की असेल तर योग्य वयात निर्णय घ्या. म्हणजे पुढच्या सर्व गोष्टी सोप्या होतात. नाहीतर मुलगा-मुलगी अशीच पाहिजे,शिक्षण,रूप ,नोकरी ,शहर ,कुटुंब या संदर्भातल्या तुमच्या अपेक्षा तुमच्या स्वतःकडे न बघता खूप उच्च असतील तर नकारांना तोंड द्यावे लागेल.मग आपले वय वाढत जाते आणि आपण त्या सर्व प्रक्रियेलाच कंटाळतो. कंटाळलेली व्यक्ती मग कोणत्याही थातूर -मातुर गोष्टींवर विश्वास ठेवायला लागते आणि शेवटी दुःखी होते.त्यामुळे सुरुवाती पासूनच स्वतः आपण कसे आहोत याचा नीट विचार केला तर दुसऱ्या व्यक्तीकडे चिकित्सकतेने न बघता समजुतीच्या भावनेने बघितले तर पुढील जोडीदार सहितचे आयुष्य सहज सुंदर होण्यास मदत होते.
   
योग्य वेळी लग्नाचा निर्णय माणूस म्हणून व्यक्ती म्हणून सहज जगता येइल अशा अनुरूप अपेक्षा आणि तडजोडीची तयारी असेल तर नीता सारखं आम्ही तुमचं अभिनंदन करण्यास तयार आहोत

No comments:

Post a Comment