Wednesday 9 May 2012

सप्तपदी




    
www.daptaryswiwah.com   डॉक्टरांची नृत्यकला स्पर्धा झाली होती आणि त्यात मयंक आणि मधुरेला प्रथम बक्षीस मिळालं होतं.उत्कृष्ट जोडी म्हणून सगळेजण त्यांचं कौतुक करत होते. ते दोघेही खुशीत होते. खुशीतच मयंकने मधुरा पुढे हात केला आणि स्टेजकडे चलण्याची खूण केली.पण मधुराला वाटलं,एवढ हातात हात घालून जायचं कशाला? म्हणून तिने नंतरची खुण केली. तर मयंक म्हणाला,अग लाजतेस कशाला? सप्तपदी सुद्धा आपण अशीच पुरी केली आहे. सगळ्या हिंदू लग्नात सप्तपदीची परंपरा पाळली जाते. काहीजण त्याचा अर्थही जाणूनही घेतात.पण नवीन काळात अनेक गोष्टी बदलल्या आहेत.पण आपल्याला लग्न करून ते छान टिकवायचे आहे तर ती सप्तपदी थोडी वेगळी असावी असं नाही वाटत.?वाटतं ना?
    त्या सप्तपदीचा विचार करतांना मला लग्नाकडे वळणारे पहिलं पाऊल हे स्वतःला ओळखणे हे वाटते. आपण कसे आहोत हे एकदा आपल्याला कळले की,प्रेमाची परिभाषा ठरवता येते. कारण बऱ्याच मुला-मुलींना स्वतःला नक्की काय आवडते? स्वतःचा स्वभाव कसा आहे? हेच स्पष्ट नसते. ते कपडेलत्ते,खाणंपिणं,या मुद्दांपर्यंतच विचार करतात. या आवडण्याच्या पलिकडे विचार करायला हवा.तर आपल्या जोडीदाराला त्याच्या पद्धतीने वाढायला वाव देता येईल आणि मगच ते प्रेम होईल.
  स्वतःला ओळखून प्रेम करता आले की,दुसरी पाऊल आहे.बदल स्वीकारण्यास तयार रहा. कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय लग्नामुळे होणारा बदल स्वीकारा. आज जग झपाट्याने बदलत आहे. तिथं आपण बदललो नाहीतर मागे पडू असं आपल्याला वाटते न? तसेच आहे.लग्नाकडे पारंपारिक नजरेने न बघता नवीन काळाच्या दृष्टीकोनातून बघायला हवे.म्हणजे जोडीदाराकडे  विशिष्ट चौकटीतून न बघता तो जसा आहे तसा बघा,आणि वेळोवेळी होणारे जोडीदारातील विधायक,नैसर्गिक बदल स्विकारा.
     लग्न करतांना आणि केल्यावर अनेक प्रकारच्या भूमिका आपल्याला आपोआप मिळतात.त्या त्या भूमिकांना आपण न्यायही देत असतो. पण पती-पत्नीच्या भूमिकेत अनेक सत्र असतात. त्यांची देवाणघेवाण करता यायला हवी.आजकाल सर्वजणांना शिकलेली आणि नोकरी करणारी मुलगी हवी असते. कारण दोघांच्या पगारात घर चालविणे सोपे जाते.म्हणजे स्त्री कमावण्याची जबाबदारी घेते आहे. तिच्या भूमिकेशी समांतर पुरुषांनाही आपल्या भूमिकेत बदला करायला हवेत.घर संभाळण,मुलांचं संगोपन,घरातील वृद्धांची सेवा यातली कौशल्य आत्मसात करायला हवीत. घर दोघांचं आहे.म्हणून भूमिकेत अदलाबदल गरजेची आहे.
   घरामध्ये जोडीदाराबरोबर राहतांना मुखवटे टाळा,ते घालू नका. इतरांशी वागतांना एक चेहरा आणि घरात वागतांना दुसरा चेहरा असं आपण करत असू तर जोडीदाराला गृहीत धरणं होईल.असं करु नका. जोडीदाराचा स्वाभिमान दुखवू नका.

         जोडीदाराचा सन्मान हे पाचवे पाऊल आहे. फक्त आधारासाठी,स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी नातं नसतं.जोडीदारा विषयी आदर,प्रेम मनापासून असायला हवं.जोडीदार सुंदर,पैसेवाला या कारणासाठी तो सन्मान नको तर त्याच्यातील छोट्या गुणांवर प्रेम करा. समोरची व्यक्ती ही स्वतंत्र आहे.हे लक्षात ठेवायला हवं नाही का?
      लग्न पूर्ण जबाबदारीने केले की त्याची अडचण वाटत नाही. म्हणून लग्न झाल्यावर सुद्धा विकसित व्हा.हे पुढचे सहावे पाऊल आहे. दोघांच्या  वेगवेगळ्या गुणांना वाव मिळेल. अशा संधी स्वीकारणं आणि विकसित होणं सहजीवनातला आनंद वाढवतो.
  केवळ लग्नातून नाही तर संपूर्ण जीवनभर शिकतच असतो. परंतु लग्नासह शिकत राहता आलं पाहिजे.इथे स्वयंशिक्षण  ला ,आत्मपरीक्षणाला पर्याय नाही.लग्न ही जगण्याची ,कौशल्य शिकवणारी शाळा आहे.कारण दोन वेगळ्या अनोळखी व्यक्ती एकमेकांशी अत्यंत अनोख्या नात्याने लग्नामुळे जोडल्या जातात.आपल्यात भावनिक मानसिक पातळीवर अनेक बदल होतात.त्यांना सामोरं जाणं आणि त्यातून स्वतःला घडवण हे आवश्यक असतं.
  मित्रांनो या पाऊलांवरून चालले की लग्न ही एक सुंदर गोष्ट होवून जाते.

No comments:

Post a Comment